रमाई घरकुल आवास योजना 2023

रमाई घरकुल आवास योजना

रमाई घरकुल आवास योजना 2023         नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन योजना आपल्या सर्वांचे माहितीसाठी घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र सरकारच्या मार्फत राज्यातील आर्थिक दुर्बल आणि गरीब सर्वसामान्य नागरिकांसाठी कल्याणकारी योजना तिचे नाव रमाई घरकुल आवास योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्वकांक्षी राज्य पुरस्कृत योजना आहे. ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न कमी … Read more

Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2023 | प्रधान मंत्री फसल बीमा योजना २०२३

Pradhan Mantri Fasal Bima Yojana

  Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजना २०२३  भारत हा कृषिप्रधान देश आहे. बहुतांश लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील लोकसंख्या ही सुद्धा शहरी भागापेक्षा जास्त आहे. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी यांनी 13 जानेवारी 2016 रोजी Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधान मंत्री फसल बीमा योजना या … Read more

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023

स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 | Swadhar Yojana 2023        भारत देश हा विकासशील देश आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वर होत आहे त्यामुळे औद्योगिक क्षेत्र बरोबर शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात सुद्धा कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी व्यावसायिक बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. तसेच या … Read more

पाच लाख रु विमा संरक्षण मोफत प्रत्येक नागरिकाला | Ayushman Bharat Yojana Maharashtra 2023

 

            आयुष्यमान भारत योजना |Ayushman Bharat Yojana

मित्रानो, आपण आयुष्मान भारत योजना | Ayushman Bharat Yojana  किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना या एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकार गरीब कुटूंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करते. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभरात चालवली जात आहे. भारत सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील १० कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळेल. यासाठी तुम्हाला आयुष्मान भारतचे कार्ड बनवावे लागेल, त्यासाठी काही आवश्यक पात्रता निर्धारित करण्यात आलीय. पात्र लोक हे कार्ड बनवू शकतात आणि हॉस्पिटलमध्ये ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात.

 आयुष्यमान भारत योजना |Ayushman Bharat Yojana  

जन आरोग्य योजना हि राज्यातील सर्व शिक्षा पत्रिका/ रेशन कार्ड, धारक आदिवासी प्रमाणपत्र धारक या सर्व नागरिकांना लागु करणेचा निर्णय घेण्यात आला आहे .त्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होवून या योजने अंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुठुंब अडीच लाख रुपये वरून पाच लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला आहे .

सरकारच्या आयुष्मान भारत योजनेत (Ayushman Bharat Yojana) समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना आरोग्य विम्याची सुविधा मिळते. एबीवाय योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाही संबोधले जाते. Ayushman Bharat Yojana या योजनेच्या माध्यमातून देशातील 10 कोटी कुटूंबांना प्रतिवर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत आहे. आर्थिक व सामाजिक दृष्टी अंतर्गत ग्रामीण भागातील ८.०३ कोटी कुटूंब आणि शहरी भागातील २.३३ कोटी कुटूंबे आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत येतील. सध्या आयुष्मान भारत योजनेत ६२,६६७ कूटूंब पात्र आहेत.

Ayushman Bharat Yojana  
Ayushman Bharat Yojana

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनाचा एकत्रित लाभ घेता येणार आहे. तसेच दोन्ही योजनाची अंगीकृत आरोग्य केंद्रावर उपचार घेता येणार आहे . महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये एकूण ९९६ तर  प्रधानमंत्री जन आरोग्य योजने मध्ये १२०९ उपचार आहेत आता मिळून दोन्ही योजनाची उपचार संख्या १३५६ करणेत आली आहे. Ayushman Bharat Yojana या योजनासाठी एकूण आरोग्यसेवा रुग्णालयाची संख्या १ हजार एवढी करण्यात आली आहे .

आयुष्मान भारत योजनेची वैशिष्टे| Ayushman Bharat Yojana’s features

  1. राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियानात प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख अशी आरोग्य संदर्भात संरक्षण लाभ कवच असेल.
  2. या योजनेचे फायदे देशभरात सर्वत्र आहेत आणि योजनेअंतर्गत समाविष्ट लाभार्थ्याला देशभरातील कोणत्याही सार्वजनिक/खाजगी रुग्णालयांमधून कॅशलेस लाभ घेण्याची परवानगी दिली जाईल.
  3. Ayushman Bharat Yojana – राष्ट्रीय आरोग्य संरक्षण मिशन ही सामाजिक व आर्थिक जात जनगणना डेटाबेसमधील वंचिततेच्या निकषांच्या आधारे पात्रता ठरविलेली पात्रता आधारित योजना असेल.
  4. लाभार्थी सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही वैदकीय सुविधांमध्ये लाभ घेऊ शकतात.
  5. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी, उपचारांसाठीची किमत सरकार ने दिलेल्या पॅकेज परीपत्रकाच्या आधारावर केली जातील.
  6. आयुष्मान भारत – राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियानाच्या मुख्य तत्त्वांपैकी एक म्हणजे सहकारी संघराज्य आणि राज्यांसाठी लवचिकता निर्माण करणे होय.
  7. धोरणात्मक निर्देश देण्यासाठी आणि केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च स्तरावर आयुष्मान भारत राष्ट्रीय आरोग्य संरक्षण मिशन परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.
  8. Ayushman Bharat Yojana लागू करण्यासाठी राज्यांना स्टेट हेल्थ एजन्सी असणे आवश्यक आहे.
  9. योजनेचा निधी वेळेवर पोहोचेल याची खात्री करण्यासाठी, केंद्र सरकारकडून आयुष्मान भारत – राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियानाद्वारे राज्य आरोग्य संस्थांना निधी हस्तांतरित करणे थेट एस्क्रो खात्याद्वारे केले जाऊ शकते.
  10. नीती आयोगाच्या भागीदारीत, एक मजबूत, मॉड्युलर, स्केलेबल आणि इंटरऑपरेबल आयटी प्लॅटफॉर्म कार्यान्वित केले जाईल ज्यामध्ये पेपरलेस, कॅशलेस व्यवहार होईल.

कार्ड वाटप लवकर चालू होईल

महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेचे पूर्वीचे कार्ड या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत विलीन केले जाणार आहे तसेच नवीन कार्ड ची नोंदणी लवकरच सुरु होईल. अशा प्रकारे केंद्र व राज्य सरकार दोन्ही मिळून एकत्रित हि योजना राबवत आहे .ज्यांचे कार्ड बनवले नाही अशा सर्वांसाठी कार्ड नोंदणी चालू आहे आपण सरकारच्या वेब संकेत स्थळावर जावून नोंद करू शकता.

निष्कर्ष :

प्रधान मंत्री Ayushman Bharat Yojana हि प्रत्येक नागरिकाच्या हिताची भारत सरकारची आरोग्यदायी योजना आहे . सर्व नागरिकांना वैद्यकीय क्षेत्रात पैशाअभावी उपचार घेता यावा यासाठी सरकार नि हि हितकारी योजना संयुक्तपणे राबवली आहे . प्रत्येक कुठुंब व कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती यांच्यासाठी प्रती ५ लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे .माहिती आवडली असेल तर इतरांना पाठवा, धन्यवाद.

Read more